Posts

१५ ऑगस्टला झेंडा फडकावून आणि मेणबत्त्या पेटवून लोक आपली फसवणूक करतात

Image
 भारतात सेवा करणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना इंग्लंडला परतल्यावर सार्वजनिक पद/जबाबदारी देण्यात आली नाही. तर्क असा होता की त्यांनी गुलाम राष्ट्रावर राज्य केले, ज्यामुळे त्यांच्या वृत्ती आणि वागणुकीत फरक पडला असावा. त्याला येथे अशी जबाबदारी दिल्यास तो मोफत ब्रिटिश नागरिकांप्रमाणेच वागेल.   हे समजून घेण्यासाठी खालील वाक्य वाचा   एक ब्रिटीश स्त्री जिचे पती ब्रिटिश राजवटीत पाकिस्तान आणि भारतात नागरी सेवा अधिकारी होते. महिलेने आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे भारताच्या विविध भागात घालवली. परत आल्यावर त्यांनी त्यांच्या आठवणींवर आधारित एक सुंदर पुस्तक लिहिले.   महिलेने लिहिले की, माझे पती एका जिल्ह्याचे उपायुक्त असताना माझा मुलगा सुमारे चार वर्षांचा आणि माझी मुलगी एक वर्षाची होती. उपजिल्हाधिकार्‍यांच्या मालकीच्या अनेक एकरांवर बांधलेल्या वाड्यात ते राहत होते. शेकडो लोक डीसीच्या घरच्या आणि कुटुंबाच्या सेवेत गुंतले होते. रोज पार्ट्या होत होत्या, जिल्ह्यातील बड्या जमीनदारांनी आम्हाला त्यांच्या शिकार कार्यक्रमांना आमंत्रित केल्याचा अभिमान वाटत होता आणि आम्ही गेलो होतो ते सर्वजण हा सन्मान मानत. रा

किस्से_पोस्टमनचे हयातीचा_दाखला

त्यादिवशी बांगरवस्तीवर गेलो होतो..पवार आज्जींनी कोंडे तात्यांकरवी सांगावा धाडला होता..' तात्या ,त्या पोश्ट्यामनं पोराला म्हणावं म्या बोलीवलयं घरी..आन ज्यावानं करुन येवं नगं म्हणावं..' कोंडे तात्यांच पोस्टात नेहमी येणं-जाणं असायचं..शनिवारी असचं ते आले असता त्यांनी मला हा निरोप सांगितला..कामाच्या धांदलीत मी विसरून गेलो..सोमवार उजाडला खरा पण आठवड्याचा पहिला दिवस असल्याने टपालाचं प्रमाण खूप असतं..त्यामुळे तोही दिवस आज्जींची आठवण न काढताच गेला.. आज्जी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या..मंगळवारी न चुकता मी आज्जींकडे गेलो..आज्जींना एकुलता एक मुलगा3 Full stopघरची दोन एकर जमीन.. आईबापाचं अन् बायकोचं पटत नव्हतं म्हणून तो वेगळा राहतं होता..गावात चर्चा नको म्हणून आज्जींनी तेही सहन केलं3 Full stopतुटपुंज्या पेंशनवर दिव्यांग नवर्याचं खाणं-पिणं,दवाखाना या गोष्टी ती कशाबशा भागवत होती..स्वतःकडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता..त्या आपल्या पेंशनर पतीसोबत आयुष्यातील उर्वरित दिवस कसंबसं काढतं होत्या.. पती जरूर पेंशनर होते परंतु त्यांचे पाय निकामी झालेले होते..वाचा गेलेली होती..हगणं-मुतणं जाग

पांडुरंग

Image
पांडुरंग , पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे , त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे...  आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो.... म्हणून त्याला" विजयी पांडुरंग" असे म्हणतात.  या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे ,हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपाने मिळालेला आहे ही मूर्ती दिडफुट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं त्याने मंदिर बांधलं आणि सोनारकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला  "माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध